मन सागरापरी खोल, त्याचा कोणा लागे थांग
मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग
मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता
त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता
मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले
किती शोधले तरी, न एक डोळा दिसले
मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता
डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता
मन कणखर किती , सावटाची दाटे भीती
सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि नाती
मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ
मन सहिष्णू धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ
मन एकाकी कधी अन कधी सामावे सर्वांसी
रात्र काळोख दाटता, उजळे प्रकाश चंद्रासी
मन अवखळ कधी, अन कधी क्रोधात कोपता
मन प्रेमळ कधी , अन कधी निरव शांतता
न कळले हे मन , न माझे न तुझे
मन होता हे उदास, मानसी अश्रुंचे हे ओझे
कधी चंचल हे मन, अन कधी हर्षता आनंदे
कधी एकटे च रुसते अन कधी गाते तुझ्या संगे
कधी सापडेल का हे मन, माझ्या मुठीत या बंद
वाटे, नकोच सापडावे , मुक्त विहरू दे स्वच्छंद
जर कधी लागलच ठाव, या उनाड मनाचा
उरे काय अर्थ ह्या जगण्याचा
बरे आहे , हे असेच , काही कोडी न सुटतात
रिक्त ओंजळ हे माझी, न काही उरले उरात
मन कोणासी कळले , भले भले हि थकले
जंग जंग पछाडून , हाती काही न लागले
मनाबद्दल हे विचार पण, माझ्या मनातलेच बोल
मानसी बोलता स्वतःच्या, कळे मनाचे हे मोल
नको उत्तर शोधूं या, या मनाच्या प्रश्नाचे
तेच असेल हे जगण्याचे ऋण , जे बाकी असेल फेडायचे
-शीतल
मन भिरभिरे वाऱ्यावरी, त्याला धरू कसे सांग
मन मोकाट सुटता, त्याचा माग न लागता
त्याचे संगे धावू किती, न पाऊल थकता
मन सुटे सुटे झाले, अन डोहात दडले
किती शोधले तरी, न एक डोळा दिसले
मन हळुवार किती, थोडे शब्द तीर हे लागता
डोळ्यामध्ये मन उतरते, अश्रू हे दाटता
मन कणखर किती , सावटाची दाटे भीती
सावरे स्वतःला लगेच, अन सावरे प्रीतीची हि नाती
मन कधी किती गूढ , जणू कृष्ण माई संथ
मन सहिष्णू धर्माचे , त्याला कोण पुसे त्याचा पंथ
मन एकाकी कधी अन कधी सामावे सर्वांसी
रात्र काळोख दाटता, उजळे प्रकाश चंद्रासी
मन अवखळ कधी, अन कधी क्रोधात कोपता
मन प्रेमळ कधी , अन कधी निरव शांतता
न कळले हे मन , न माझे न तुझे
मन होता हे उदास, मानसी अश्रुंचे हे ओझे
कधी चंचल हे मन, अन कधी हर्षता आनंदे
कधी एकटे च रुसते अन कधी गाते तुझ्या संगे
कधी सापडेल का हे मन, माझ्या मुठीत या बंद
वाटे, नकोच सापडावे , मुक्त विहरू दे स्वच्छंद
जर कधी लागलच ठाव, या उनाड मनाचा
उरे काय अर्थ ह्या जगण्याचा
बरे आहे , हे असेच , काही कोडी न सुटतात
रिक्त ओंजळ हे माझी, न काही उरले उरात
मन कोणासी कळले , भले भले हि थकले
जंग जंग पछाडून , हाती काही न लागले
मनाबद्दल हे विचार पण, माझ्या मनातलेच बोल
मानसी बोलता स्वतःच्या, कळे मनाचे हे मोल
नको उत्तर शोधूं या, या मनाच्या प्रश्नाचे
तेच असेल हे जगण्याचे ऋण , जे बाकी असेल फेडायचे
-शीतल

