कधी रिमझिम, कधी तुफान
कधी एखादी सर, कधी एखादाच थेंब
तळहातावर झेलेलेला, मोत्यापरी
अन मनात मात्र तुझ्या आठवणीच्या
चिंब चिंब सरी
एक पाऊस आसमंत भिजवणारा
आणि माझ्याच मनातला पाऊस
काही ओले क्षण जपणारा
आठवतो का रे तो पाऊस
पूर्ण संध्याकाळ कोसळत होता
वेड्या सारखा, रपरपत
आणि आपण हि वेड्या सारखे
प्रेम करत होतो त्या पावसावर
अन एकमेकांवर हि पण अव्यक्त
बेभान पाऊस अन बेभान मन
बोलू कि न बोलू या जाणिवेने
बेचैन, अस्वस्थ झालेलं मन
काय माहित काय झाले
बाहेरचा पाऊस
डोळ्यात उतरला
अन सारे सारे काही उमजले
शब्दाविना
त्या नंतर किती तरी वेळा
पाऊस असा बरसला
पण जसा त्या वेळी चिंब
करून गेला, तो बस एकदाच
आठवतो का रे तो पाऊस
काही भिजलेला क्षण जपणारा
शीतल
#marathikavita #marathipoem #paus #pavusanikavita #pavasavarachikavita #marathiblogs
No comments:
Post a Comment