हि कविता मला सुचली, ती एका कादंबरी मुळे, सुमती क्षेत्रमाडे यांनी लिहिलेली "युगंधरा" हि कांदबरी, त्यातील युगा, मला फारच भावली अन म्हणूच या ओळी सुचल्या, बरेच वर्षे झाली आता लिहून, पण आज परत एकदा आठवली हि कविता अन युगा सुद्धा :
दूर दूर जाताना सूर थोडे घेवून जा
प्रीतीच्या गाण्याच्या सुरेल आठवणी मात्र देवून जा
प्रीतीच्या गाण्याच्या सुरेल आठवणी मात्र देवून जा
दूर दूर जाताना पाश सारे तोडून जा
आठवणीचे रेशीमबंध सुजाणपणे सोडून जा
आठवणीचे रेशीमबंध सुजाणपणे सोडून जा
दूर दूर जाताना श्रावण सारा घेवून जा
ओल्या आठवणीचा मृद्गंध थोडा ठेवून जा
ओल्या आठवणीचा मृद्गंध थोडा ठेवून जा
दूर दूर जाताना मोरपिसं सारी घेवून जा
जाताना मात्र, हातांवर रंग थोडे सोडून जा
जाताना मात्र, हातांवर रंग थोडे सोडून जा
दूर दूर जाता सुखं सारी घेवून जा
जाता जाता थोडे अश्रू मागे पापण्यावर ठेवून जा
जाता जाता थोडे अश्रू मागे पापण्यावर ठेवून जा
-शीतल
#marathikavita #marathipoem
No comments:
Post a Comment